या मार्गाची सुरुवात झाली तेव्हा बाबा जुमदेवजी यांनी भगवंताची प्राप्ती करुन आपल्या परीवाराचे दुःख दुर केले.त्या वेळेस सामाजिक कार्य सुद्धा सुरू केले.”एक व्येक्ती आपल्या विचाराने संपुर्ण देशाला बदलू सकतो”ही म्हन बाबांना तंतोतंत लागु होतो. धार्मिक, सामाजीक कार्य करित असतांना बाबांनी सेवकांना जवळुन पाहीले. ओळख या मार्गाची परंपरा आहे.
दरवरशी जी कोजागिरी पोर्णिमा येते.ती दुध पिवुन साजरी केली जाते.आपल्या मार्गात या परंपरेची सुरुवात शांतीनगर मधून झाली. ज्या सेवकांनी ही सुरुवात केली.त्या मागे त्यांचा स्वार्थ होता.त्याचा अनुभव असा की,तो सेवक बाजारातून दुध न देणारी गाय,म्हैस खरेदी करीत होता. ती गाय,म्हैस खुप असक्त असायची.त्या सेवकाला जानिव होती ,की बाबा आपल्या घरी आले आणि ह्या गाय,म्हैसी च्या पाठि वरुन जरी हात फिरवले .तरी सुद्धा तीचे संपूर्ण दुःख दुर होत असायचे.
काही वर्षानंतर लालगंज पेवढा, येथील एका सेवकाने म्हटले कि,बाबा माझ्या घराच्या गच्चीवर पुष्कळ जागा आहे.या वर्षी कोजागिरी आपन माझ्या घरी साजरी करावी. याला बाबांनी होकार दिला.या कोजागिरीत पुष्कळ सेवक हजर होते.तो सेवक खुप हुशार होता.त्या सेवकानि बाबाला म्हटले कि, दरवर्षी आम्ही कोजागिरीत दुधच पितो.आज आपन दुधामध्ये थंडाई(भांग) टाकुन पाजायचे. बाबांनी या गोष्टीला होकार दिला. कारण बाबा सेवकांच्या ईच्छेला टाळत न्हवते. कारण बाबाला जे निराकार शब्द मिळाले .त्या “ ईच्छा नुसार भोजन “या शब्दाचा समावेश होता. परंतु ह्या शब्दांचा सुद्धा दुर उपयोग सेवक करीत आहेत.कोजागिरी झाल्या नंतर एक-एक कप दुध सेवकांनी प्राशन करुन काही सेवक घरी गेले. बाबा सुद्धा गेले. परंतू काही सेवक उरलेले दुध पुन्हा पिवु लागले.त्यानी दुध भरपूर प्रमाणात प्राशन केले.ईतके दुध प्यायले कि त्यांना घरी जाण्याचा सुद्धा होश राहीला नाही.कोणी सेवक गच्चीवर ,पायरीवर, नालीत सुद्धा पडुन होते.आणि ही घटना बाबांसमोर आली .तेव्हा बाबांना सेवकांचे वाईट व्येसन बंद करण्याबाबत विचार करावा लागला.
।।धन्यवाद।।
।। मानवधर्म सेवक परिवार।।






